कहाणी म्हणजे कुणावर दोषारोप नव्हे, कबुलीजबाब नव्हे, किंवा ही साहसकथा तर मुळीच नाही. कारण ज्यांना मृत्यूचे अस्तित्व समोर जाणवते त्यांच्यासाठी ते साहस नसते. ही अशा पिढीची कथा आहे, जी भले दारूगोळ्यापासून वाचली असेल, पण युद्धाने तिला उद्ध्वस्त करून टाकले होते…’
